loader image
[ays_poll id=7]

कलम १५५ च्या वापरावर राज्य सरकारकडून निर्बंध!

Sep 2, 2026


महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम १५५च्या अधिकाराच्या गैरवापराच्या घटना समोर आल्यानंतर राज्य सरकारने त्याच्या वापरावर निर्बंध घातले आहेत.
आता या कलमाचा वापर महसूल नोंदी, सातबारा किंवा भूमी अभिलेखातील केवळ साध्या लेखन व टंकलेखनाच्या चुका दुरुस्त करण्यापुरताच मर्यादित राहणार आहे.
त्यामुळे राज्यात आता जमिनीचा मालकीहक्क, क्षेत्रफळ किंवा हक्कसंबंधी नोंदींमध्ये बदल करण्यासाठी कलम १५५चा वापर करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निर्णयामुळे सातबारा व महसूल नोंदीत मनमानी पद्धतीने बदल करण्यास आळा बसेल. किरकोळ चुका दुरुस्त करण्यापुरताच कलम १५५चा वापर मर्यादित राहिल्याने जमिनीच्या मालकीहक्काशी संबंधित नोंदी सुरक्षित राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे.


अजून बातम्या वाचा..

शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सचिन पटेल व ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीत चर्चा

शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सचिन पटेल व ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीत चर्चा

मनमाड शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात येथील ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिनांक ९...

read more
बघा व्हिडिओ – मनमाडच्या कांत परिवाराने ‘तैवान देशात’ साजरी केली श्री गुरुनानकजी जयंती

बघा व्हिडिओ – मनमाडच्या कांत परिवाराने ‘तैवान देशात’ साजरी केली श्री गुरुनानकजी जयंती

मनमाड : ( योगेश म्हस्के )येथील प्रसिद्ध व्यापारी आणि निराला स्टोअर्सचे संचालक श्री गुरूदीपसिंग...

read more
ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला – १८ डिसेंबर रोजी मतदान, २० डिसेंबरला निकाल

ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला – १८ डिसेंबर रोजी मतदान, २० डिसेंबरला निकाल

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्राम पंचायत निवडणुकांची तारीख जाहीर केली असून...

read more
.