loader image
[ays_poll id=7]

कलम १५५ च्या वापरावर राज्य सरकारकडून निर्बंध!

Sep 2, 2026


महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम १५५च्या अधिकाराच्या गैरवापराच्या घटना समोर आल्यानंतर राज्य सरकारने त्याच्या वापरावर निर्बंध घातले आहेत.
आता या कलमाचा वापर महसूल नोंदी, सातबारा किंवा भूमी अभिलेखातील केवळ साध्या लेखन व टंकलेखनाच्या चुका दुरुस्त करण्यापुरताच मर्यादित राहणार आहे.
त्यामुळे राज्यात आता जमिनीचा मालकीहक्क, क्षेत्रफळ किंवा हक्कसंबंधी नोंदींमध्ये बदल करण्यासाठी कलम १५५चा वापर करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निर्णयामुळे सातबारा व महसूल नोंदीत मनमानी पद्धतीने बदल करण्यास आळा बसेल. किरकोळ चुका दुरुस्त करण्यापुरताच कलम १५५चा वापर मर्यादित राहिल्याने जमिनीच्या मालकीहक्काशी संबंधित नोंदी सुरक्षित राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे.


अजून बातम्या वाचा..

नाशिक वाहतूक पोलीस आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे रस्ते अपघातांबाबत जनजागृती

नाशिक वाहतूक पोलीस आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे रस्ते अपघातांबाबत जनजागृती

जागतिक ट्रॉमा दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि नाशिक पोलिसांच्या सहकार्याने जनजागृती अभियान...

read more
वाचक प्रेरणा दिन – मनमाड सार्वजनिक वाचनालयात आमदार मिर्झा यांच्या निधीतून २८१ पुस्तकांची ग्रंथ संपदा वाचकांसाठी समर्पित

वाचक प्रेरणा दिन – मनमाड सार्वजनिक वाचनालयात आमदार मिर्झा यांच्या निधीतून २८१ पुस्तकांची ग्रंथ संपदा वाचकांसाठी समर्पित

मनमाड सार्वजनिक वाचनालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त व वाचक प्रेरणा...

read more
.