loader image
[ays_poll id=7]

करपलेल्या पिकांच्या नुकसानीचे थेट शेतात जाऊन सर्वेक्षण होणार!

Sep 10, 2026


महिनाभरापेक्षा जास्त काळापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ज्या उभी पिके करपून गेलेल्या भागाचे अधिकारी शेतात येऊन हे सर्व्हेक्षण करणार आहेत. काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन आणि मुख्य सचिवांना त्याबाबतचे आदेशच दिल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग तिघेही मिळून हे सर्व्हेक्षण करणार आहेत. हे संपूर्ण सर्व्हेक्षण झाल्यानंतर शेतकऱ्यांना निश्चित मदत करण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.


अजून बातम्या वाचा..

मविप्र च्या आदर्श इंग्लिश मेडिअम स्कुल, मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

मविप्र च्या आदर्श इंग्लिश मेडिअम स्कुल, मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आदर्श इंग्लिश मेडिअम स्कुल, मध्ये आज महात्मा गांधी व लाल...

read more
‘रायडर्स इन द वाइल्ड…’ २५ सुपरबायकर्स १४०० किलोमिटर प्रवास करून देणार साहसी उपक्रमांना प्रोत्साहन

‘रायडर्स इन द वाइल्ड…’ २५ सुपरबायकर्स १४०० किलोमिटर प्रवास करून देणार साहसी उपक्रमांना प्रोत्साहन

मध्यप्रदेशातील इंदोर येथील पर्यटन आणि संस्कृतीचे प्रधान सचिव आणि पर्यटन मंडळाचे व्यवस्थापकीय...

read more
बघा व्हिडिओ – इसापूर येथे विहिरीत पडला बिबट्या – वन विभागाने पिंजरा टाकून पकडले

बघा व्हिडिओ – इसापूर येथे विहिरीत पडला बिबट्या – वन विभागाने पिंजरा टाकून पकडले

येवला तालुक्यातील विसापूर येथील शेतकरी संतोष सिताराम सोनवणे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला....

read more
.