loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आजी आजोबा दिन उत्साहात संपन्न

Sep 18, 2026


मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आजी आजोबा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर मॉल्कम ,माननीय उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, माननीय पर्यवेक्षक श्रीयुत अनिल निकाळे सर तसेच निमंत्रित आजी आजोबा म्हणून श्री. भानुदास पुंजाजी जाधव व सौ. काशाबाई भानुदास जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुद्र सचिन इंगळे याने केले तर आभार प्रदर्शन कुमारी विद्या विनोद कुसमाडे हिने केले. सिद्धार्थ विनोद साबळे याने आपल्या भाषणातून कुटुंबातील आजी आजोबांचे महत्त्व विषद केले तर माननीय मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील आजी-आजोबांचा आदर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. निमंत्रित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री भानुदास जाधव यांनी आपल्या भाषणातून आजी-आजोबांचं नातूच्या जीवनातील महत्त्व सांगून आजी-आजोबांची काळजी घेण्याचे आवाहन केले. श्री व सौ जाधव हे शाळेतील इयत्ता दहावी ब ची विद्यार्थिनी कुमारी मयुरी त्रिलोक जाधव हिचे आजी आजोबा आहेत.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.