loader image
[ays_poll id=7]

आक्षेपार्ह पोस्ट डिलिट करणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचाच प्रकार: हायकोर्ट!

Sep 16, 2021


समाज माध्यमांवर एखाद्या धर्माविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यानंतर ते संदेश डीलिट करणे हा एकप्रकारे पुरावे नष्ट करण्याचाच प्रकार असून अशा स्वरूपाचा गुन्हा रद्द करता येत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले.

जफर अली शेर अली सैय्यद (वय ५८) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवले. आरोपी कन्हान येथील रहिवासी असून ऑक्टोबर २०१९मध्ये कन्हान येथे दुर्गा उत्सवादरम्यान परिसरातील लोकांचा व्हॉट्सअॅप समूह तयार करण्यात आला होता. त्या समूहावर जफर अलीने धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यामुळे समूहातील दुसरे सदस्य मनीष सिंह यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच जफर अली हा पळून गेला व सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला. त्यानंतर तो पोलिसांसमोर हजर झाला असता त्याने आपल्या भ्रमणध्वनीतून तो संदेश नष्ट केला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.

न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर धार्मिक भावना भडकवणारे, समाजात तेढ निर्माण करणारे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा आहे. तसेच तसे संदेश नष्ट करणे हा एकप्रकारे पुरावा नष्ट करण्याचाच प्रकार असून यासंदर्भात पोलिसांनी तपास करून खटला चालवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याची आरोपी जफर अलीची विनंती फेटाळली.


अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
.