क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिवीरांगना हौसाबाई भगवानराव पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. क-हाड येथील कृष्णा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 97 वर्षांच्या होत्या. हौसाबाई पाटील यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यलढ्यासाठी आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सामाजिक-सांस्कृतिक लढ्यासाठी समर्पित केले. त्या शूर, निर्भीड आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या.
मुंबईत २७ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, दि. २७ जून ते शुक्रवार, दि. १२ जुलै २०२४ या...










