loader image
[ays_poll id=7]

भाजपा करणार राज्यव्यापी पर्यावरण रक्षक पंधरवाड्याचे आयोजन !

Oct 10, 2021


महाराष्ट्र प्रदेश भाजपा तर्फे राजकारण करतांना सामाजिक जबाबदारी ची जाणीव ठेवून आगामी काळात पर्यावरण रक्षक पंधरवडा साजरा होणार आहे या भाजपा च्या पर्यावरण रक्षक पंधरवडा सामाजिक अभियान कार्यक्रम ची महाराष्ट्र प्रदेश संयोजक पदी ऍड माधवी नाईक(ठाणे) व प्रदेश सह संयोजक पदी प्रवीण अलई (नासिक) यांना प्रमुख जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोपवली आहे भाजपाच्या या पर्यावरण रक्षक पंधरवडा कार्यक्रमा अंतर्गत पर्यावरण रक्षण, पर्यावरण संबंधित प्रबोधन ,जनजागृती ,आणि पर्यावरण विकास या संबंधी महाराष्ट्र भाजपा संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमा  चे आयोजन करणार आहे, यात नदी/समुद्र किनारे स्वच्छ करणे ,सांडपाणी नदीत अथवा समुद्रात न सोडता त्यांचा निचरा शोष खड्डा करून करणे,पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सामजिक संघटना संस्था याना सोबत घेउन वृक्ष संवर्धन मोहीम राबविण्यात येणार आहे.                                                                                                                                                                                       या अंतर्गत राज्यात लागवड झालेल्या सुमारे एक लाख वृक्षांचे सुरक्षित संवर्धन होईल यासाठी संकल्प करण्यात आला आहे. पर्यावरण रक्षण व विकास या विषयावर प्रत्येक जिल्हा निहाय जिल्हा स्तरावर इयत्ता 05 ते इयत्ता 12 पर्यंत च्या विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा भाजपा आयोजित करणार आहे, राज्यातील मोठ्या शाळांना औषधी वनस्पती वृक्ष लागवडीसाठी भेट देण्यात येणार आहेत, सेल्फी विथ ट्री हे अनोखे अभियान या कार्यक्रमात राबविण्यात येणार आहे. यात आपले शहरातील ,गावातील जुन्या वृक्षा सोबत, तसेच आपण लागवड केलेल्या वृक्षा सोबत ,औषधी वृक्षा सोबत, दत्तक घेतलेल्या वृक्षा सोबत सेल्फी फोटो काढून तो विशिष्ट व्हाट्सएपच्या नंबर वर पाठवायचा आहे ,पर्यावरण संबंधित व्याख्यान ,स्वाक्षरी मोहीम, व इतर प्रबोधन पर कार्यक्रम चे आयोजन या पंधरवाडा कार्यक्रमात भाजपा करणार आहे. कागदी कंदील बनवणे च्या कार्यशाळा चे आयोजन असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत या संदर्भात भाजपा चे महाराष्ट्र प्रदेश संघटन महामंत्री श्रीकांतजी भारतीय यांचे प्रमुख मार्गदर्शन मध्ये आणि या पर्यावरण रक्षक कार्यक्रमा च्या महाराष्ट्र प्रदेश संयोजक ऍड माधवी नाईक यांचे अध्यक्ष खाली ऑनलाईन व्हर्चुअल बैठकी चे आयोजन करण्यात आले होते यात महाराष्ट्र तील 28 जिल्ह्यातील भाजपा प्रतिनिधी उपस्थित होते राजकारण बरोबरच एक सामाजिक जबाबदारी म्हणून हे अभियान जोरदार यशस्वी करण्यासाठी या बैठकीत नियोजन करण्यात आले.                                                                                                या अभियान कार्यक्रमाचे सह संयोजक प्रवीण अलई यांनी बैठकीचे सूत्र संचालन केले या पर्यावरण रक्षक अभियान कार्यक्रम मध्ये भाजपाचे  सर्व स्तरातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी नी सर्व सामाजिक संघटना नी सहभाग घ्यावा असे आवाहन ऍड माधवी नाईक , प्रवीण अलई यांनी केले आहे.   


अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
.