loader image
[ays_poll id=7]

शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडू : आ.कांदे

Oct 28, 2021


गेल्या महिनाभरात राज्यासह नाशिक जिल्हा व तालुक्याने पाण्याचा हाहाकार सहन केला, या अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच आपल्या तोंडाशी आलेला घास निघून गेला आहे. आता वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी वीजबिलाचे कारण पुढे करत वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा लावला असून कंपनीने तातडीने हा प्रकार थांबवावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी आज वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला 
                      मनमाड शिवसेना कार्यालय येथे महावितरण वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत आमदार सुहास कांदे यांनी बैठक घेतली. गेल्या काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन व डीपी बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे यामुळे आधीच अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी अधिक अडचणीत सापडला आहे. आमदार कांदे यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज बिलाची सक्तीने वसुली करू नये तसेच शेतकऱ्यांच्या डीपीचे कनेक्शन देखील कट करू नये अशी विनंती वजा इशारा दिला. अतिवृष्टीचा सर्वात जास्त पाऊस तालुक्यात झाला असून यामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे त्याच्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी देखील पैसे नाहीत आणि दुसरीकडे वीज बिल थकबाकीच्या नावाखाली शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. पीक हातातून गेल्यानंतर भविष्यातील पिकांवर शेतकऱ्यांची आशा लागून आहे अशातच वेळी-अवेळी संकटांना तोंड देत शेतकरी कशीबशी शेती करत आहे. शेतकरी संकटात असताना एक लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वस्थ बसू शकत नाही त्यामुळे वीज कंपनीने त्वरित वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम थांबवावी अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत घेऊन शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी सुहास कांदे यांनी दिला. येत्या काळात विज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदत देण्याच्या सूचनाही आमदार कांदे यांनी  दिल्या.
यावेळी वीज वितरण कंपनीचे एस ए तडवी, संदीप शिंदे यांच्यासह अधिकारी कर्मचारी तसेच जेष्ठ नेते अल्ताफ खान, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, तालुकाप्रमुख किरण देवरे, शहरप्रमुख मयुर बोरसे, गुलाब भाबड, मुन्ना दरगुडे, दिनेश केकान, नगरसेवक लियाकत शेख सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक...

read more
.