loader image
[ays_poll id=7]

मिशन १०० : मुंबई महानगरपालिका निवडणुकीची सूत्रे आदित्य ठाकरेंकडे !

Nov 1, 2021


शिवसेनेसाठी कायम प्रतिष्ठेची असलेली मुंबई महानगर पालिका पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजण्यास आता सुरुवात झाली आहे. महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेनेने बैठकांचा धडाका लावला आहे. फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीवर शिवसेनेने सर्व लक्ष केंद्रित केले असून युवा सेनाप्रमुख व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हातात निवडणुकीची सर्व सूत्रे असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी पालिकेत पक्षाचे संख्याबळ वाढवायचे असून बंडखोरी टाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत तसेच इच्छुकांची चाचपणी करण्यात येत आहे.

सत्ता स्थापनेसाठी ११४ नगरसेवकांचे बहुमतांची गरज असलेल्या महानगरपालिकेत शिवसेनेचे ९४ नगरसेवक आहेत. यावेळी सेनेने मिशन १०० चा नारा दिला आहे. सेना महाविकास आघाडीत असली तरी पालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढणार आहे. पक्षांतर्गत सूत्रे परिवहन मंत्री व सेना नेते अनिल परब यांच्या हाती असणार आहेत.

मुंबईत पूर्वीप्रमाणेच एकसदस्यीय प्रभाग रचना कायम राहणार असून सदस्य संख्या पूर्वीप्रमाणे २२७ इतकीच आहे. त्यात अनुसूचित जातीसाठी १५, जमातीसाठी २ तर ओबीसीला ६१ जागा राखीव आहेत. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मुंबईत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत होणार हे निश्चित आहे. 


अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
.