येत्या जुलैमध्ये भारतात जीएसटी लागू होण्याला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकार यामध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सध्या जीएसटीचे ५, १२, १८ आणि २८ टक्के असे चार टप्पे आहेत. यापैकी ५ टक्क्यांचा टप्पा रद्द करून तो १२ टक्क्यांमध्ये समाविष्ट केला जाणार असल्याचे समजते. यामुळे काही सेवा व वस्तुंचे दर वाढणार आहे. करप्रणालीत सुधारणा सुचविण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीचा अहवाल काैन्सिलच्या आगामी बैठकीसमोर मांडला जाणार आहे. या अहवालाला अंतिम रूप देण्यासाठी या मंत्रिगटाची बैठक लवकरच होणार असल्याचे समजते.












