आता कृषि आणि कृषीसंलग्न विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर शेतकरी आणि शेतमजूर यांनाही नवनवीन तंत्रज्ञान हाताळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री नामदार दादाजी भुसे यांनी सांगितले. कृषि व कृषी संलग्न विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतानाच वनामती आणि रामेती संस्थांमधून महिला, शेतकरी आणि शेतमजूर यांनाही कृषीविषयक कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठी नियोजन आणि धोरण तयार करण्याच्या सूचना कृषिमंत्र्यांनी संबधीत विभागाला दिल्या.
मेघा आहेर वैष्णवी शुक्ला साहिल जाधव यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड
दिल्ली येथे ९ ते १२ डिसेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या ६८ व्या शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी...











