loader image

करंजवण पाणी योजनेस यश मिळावे म्हणून मनमाडला साईबाबा मंदिरात साकडे

Jul 9, 2022


मनमाड येथील रोनक फाउंडेशन च्या वतीने अनकवाडे शिवारातील साईबाबा मंदिरात करंजवण मनमाड पाणी योजनेच्या यशस्वीतेसाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांना यश मिळावे म्हणून साई बाबांना साकडे घालण्यात आले.
मनमाड येथील डॉक्टर वर्षा झाल्टे तसेच रोनक फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी साईबाबा मंदिरात 101 धूप लावत साई बाबांना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नांना यश मिळावे म्हणून प्रार्थना केली.
मनमाड शहरातील माता बहिणी तसेच लहान मोठ्या व्यापाऱ्यांसाठी पाणीटंचाई हा मोठा व गंभीर प्रश्न आहे आणि आता आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून करंजवण पाणी योजना मार्गी लागली असून ती यापुढे कोणत्याही अडथळा न येता लवकरात लवकर पूर्ण होऊन आमदारांना यश मिळावे जेणेकरून मनमाडकर यांच्या सर्व महिलांना सुरळीत व मुबलक पाणी मिळेल आणि तो दिवस आमच्यासाठी आनंदाचा असेल म्हणूनच आज आमदार कांदे यांचे आभार तसेच या कार्याला यश मिळवण्यासाठी संकल्प करत आहोत असे याप्रसंगी डॉक्टर वर्षा झाल्टे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याबाबतची माहिती मिळताच शिवसेना महिला आघाडी, युवती सेना कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन डॉक्टर वर्षा झाल्टे व रोनक फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे आभार मानत आपले आशीर्वाद असेच राहू द्या लवकरच करंजवण मनमाड पाणी योजनेची भूमिपूजन होणार आहे आणि आपल्या सर्वांना वेळेवर पाणी मिळणार आहे असे सांगत सर्व महिलांचे आभार मानले.
याप्रसंगी रोणक फाउंडेशनच्या डॉक्टर वर्षा झाल्टे,सचिव संतोष वाबळे,उज्वला गायकवाड, जयश्री साळवे, मनीषा शिंदे, साधना शेलार, रेखा वाबळे, जया साळवे, जाधव जयश्री, संसारे तसेच शिवसेना महिला आघाडीच्या संगीता बागुल, पूजा छाजेड,सिद्धार्थ छाजेड, सनी बागुल उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.