मनमाडसह चांदवड तालुक्यात काल रात्री पासून झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.
आज सकाळ पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदवड तालुक्यातील शिंगवे येथे एका शेतकऱ्याचे चार एकर कांदे वाहून गेले. शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने बळीराजा कमालीचा हवालदिल झाला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे शिंगवे मनमाड रस्त्यावर पाणी साचल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.














