शिवसेना कोणाची यासाठी आता निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना 23 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रं सादर करण्यासाठीची मुदत दिली आहे, तोपर्यंत दोन्ही गटांकडून पक्षाचा ताबा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. शिवसेना कुणाची हा वाद सध्या निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. शिवसेनेतली ठाकरे आणि शिंदे गटातली लढत आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे, कारण ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ट्रक भरून कागदपत्रं निवडणूक आयोगात दाखल करण्यात आली आहेत. आजच्या एका दिवसातच 1 लाख 10 हजार शपथपत्र दाखल केल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
मनमाड शहर युवासेनेचे पदाधिकारी जाहीर
मनमाड - आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत मनमाड शहर युवासेनेच्या विविध पदांवर...









