loader image
[ays_poll id=7]

नांदगावचे गवळी आणि कांबळेंची मराठी साहित्य संमेलनातील गझल कट्ट्यासाठी निवड

Jan 7, 2023


वर्धा येथे विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील गझल कट्ट्यासाठी नांदगाव येथील गझलकार काशिनाथ गवळी आणि रविंद्र कांबळे यांची निवड झाली आहे. संमेलन दि. ३, ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार असून तीनही दिवस गझल कट्ट्यावर मुशायरे होणार आहेत. यात पहिल्या दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारीला संमेलनाच्या उद्घाटन समारोहानंतर दुपारी २ वाजता गझल कट्ट्याचे उद्घाटन होईल आणि मुशायऱ्यांना सुरुवात होईल. पहिल्या दिवशी साधारणतः पाच-सहा मुशायरे होणार असून यात प्रामुख्याने विदर्भातील गझलकारांचा सहभाग राहणार आहे. दुसऱ्या दिवशी शनिवार, दि. ४ फेब्रुवारीला सकाळी ९ ते रात्री ९ या दरम्यान आठ ते दहा मुशायरे होतील. तर समारोपाच्या दिवशी दि. ५ फेब्रुवारीला पुन्हा पाच-सहा मुशायरे होतील. या दोन्ही गझलकारांचे व कवितेसाठी कवयत्री प्रतिभा खैरनार यांची कविता वाचनासाठी निवड झाली आहे .
त्यांचे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नांदगांव तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
.