loader image
[ays_poll id=7]

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आमदार कांदे यांचे आदेश

Mar 19, 2023


नांदगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे झालेल्या नुकसानचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश तालुक्याचे आ.सुहास आण्णा कांदे यांनी दिले आहे. नांदगाव तालुक्यात शनिवारी गारपीट व अवकाळी पाउस झाला, या पावसात अनेक शेतकर्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने २१ गावातील २४०० हेक्टर क्षेत्रावरील गहू, मका, कांदा या पिकांना अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे गहू पिकाचे तसेच रांगडा व उन्हाळी कांदा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. सलग सहा दिवसांपासून पाचही महसूल मंडळात अवकाळी पाऊस पडत आहे.या मुले शेतकरी हवालदिल झाला असून शासनाने या परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन पंचनामे करून घेणे गरजेचे असल्यामुळे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी काल झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट मुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामा करण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहेत. या प्रसंगी शेतकर्यांनी धीर सोडू नये असे आवाहन आमदार सुहास कांदे यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
.