भारतीय जनता पक्षा सोबत हातमिळवणी करत एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये सत्ता स्थापन केली, यानंतर राज्यामध्ये सत्ता संघर्षांचा पेच निर्माण झाला. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद करून बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सत्ता संघर्ष प्रकरणाची सुनावणी आता पूर्ण झाली असून केवळ निकालाची प्रतीक्षा होती. गेल्या दोन दिवसांपासून याप्रकरणी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी निकाल उद्या जाहीर होणार असल्याचे जाहीर केले असून १६ आमदार अपात्र ठरतात की काय ? या बाबत जनतेमध्ये कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले आहे.
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन
मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...






