loader image
[ays_poll id=7]

मनमाडकरांची “गोदावरी” पुन्हा सुरू करा ; अन्यथा जनआंदोलन

May 17, 2023


मनमाडहून सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस कोविड काळापासून रेल्वे प्रशासनाने बंद करून मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील चाकरमान्यांच्या तोंडाला पाने पुसली होती. अनेक निवेदने देऊन शेवटी रेल्वे प्रशासनाने पर्यायी गाडी सुरू केली, सुरुवातीला सी एस टी पर्यंत धावणारी ही गाडी नंतर दादर पर्यंत करण्यात आली. काही महिन्यांनंतर आठवड्यातून तीन दिवस आणि आता तर ही गाडी धुळ्याहून सुरू केल्याने मनमाड हून रोज नाशिक येथे जाणारे चाकरमानी आणि विद्यार्थी यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. गाडीत असलेली तोबा गर्दी मुळे रोज प्रवाशांमध्ये वाद होत असून त्यामुळे तिकीट काढूनही येथील चाकरमान्यांना जागा मिळत नसल्याने रोजच भांडणाचा सामना करावा लागत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या हाल-अपेष्टांचे काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. प्रवाशी संघटनेसह लोकप्रतिनिधींनी मागणी करूनही गाडी मनमाडहन सोडली जात नसल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात संतापाची लाट निर्माण होत आहे.


अजून बातम्या वाचा..

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

मनमाड - उबाठा गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी काल रात्री अनेक पदाधिकाऱ्यांसह...

read more
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

सालाबादाप्रमाणे नांदगांव शहारातील हिन्दु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले आराध्य दैवत मस्तानी (आम्मा)...

read more
सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी 2024 या परीक्षेत...

read more
.