loader image
[ays_poll id=7]

साई भक्तांना संस्थान ची विनंती – ३० सप्टेंबर नंतर २००० च्या नोटा दानपेटीत टाकू नका

May 21, 2023


30 सप्टेंबरनंतर दोन हजारच्या नोटा दानपेटीत टाकू नका’, असे आवाहन साई संस्थानच्या वतीने साई भक्तांना केले आहे. 30 सप्टेंबर पर्यंत साईंच्या दानपेटीत दोन हजारच्या नोटा स्वीकारल्या जातील. मागील नोटबंदीच्या काळातील 3 कोटी रुपयांच्या अजूनही नोटा पडून असल्याने साई संस्थानने हा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर नंतर दोन हजारच्या नोटा न टाकण्याचे आवाहन साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी सिवा शंकर यांनी केले आहे.

देशभरातून दररोज हजारो भाविक साईंच्या दर्शनाला शिर्डीत हजेरी लावत असतात 10 रुपयांपासून लाखोंचे दान साईंच्या झोळीत अर्पण करतात. या आलेल्या दानाची मोजदाद आठवड्यातून मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी केली जाते. साईबाबा संस्थान दानाची मोजदाद केल्यावर कुठलीही रक्कम स्वतःकडे न ठेवता थेट बँकेत जमा करते त्यामुळे आता 2 हजार रुपयांच्या नोट संदर्भात झालेल्या निर्णयामुळे साईबाबा संस्थान कोणतीही अडचण नसून आलेल्या नोटा या थेट बँकेत जमा होतील. मात्र दोन हजार रुपयांच्या नोटा दानात येण्याच प्रमाण मागील काही महिन्यांपासून अत्यल्प असून मागील नोटबंदीनंतर हजार आणि पाचशेच्या नोटा मोठ्या प्रमाणात दानात उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे आता झालेल्या निर्णयानंतर दोन हजारांच्या नोटांचे दान आगामी काळात वाढणार का हे आगामी काळातच स्पष्ट होईल.


अजून बातम्या वाचा..

गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

मनमाड - मनमाड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप कुलकर्णी यांचे चिरंजीव मनमाड चे भूमिपुत्र डॉ. तन्मय...

read more
मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

  मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने...

read more
विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

मनमाड - उबाठा गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी काल रात्री अनेक पदाधिकाऱ्यांसह...

read more
.