loader image
[ays_poll id=7]

मासिक पाळी समज व गैरसमज या विषयावर मनमाड येथे करण्यात आली जनजागृती

Jun 2, 2023


दि.२/६/२०२३ रोजी मनमाड येथे श्रावस्ती नगर येथील बौध्दविहार या ठिकाणी राजाश्रय फाउंडेशन व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जि. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बालविकास प्रकल्प अधिकारी मा.श्री.अजय फडोळ सर व मा.श्री.वाकडे सर(प्रभारी अधिकारी) व सर्व मुख्यसेविका मँडम याच्यां मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सर्वप्रथम पाहुण्याच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत फुलगुच्छ देवुन करण्यात आले ..मासिक पाळी समज व गैरसमज या विषयांवर उपस्थित महिलांना अतिशय सुरेख असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले तसेच उपस्थित अंगणवाडी ताई ,विभागातील महिलांना हसत खेळत प्रश्नमंजुषा द्वारे डॉ. दिपक खाडे सर ह्यांनी मार्गदर्शन केले. स्वच्छतेचं महत्व व मासिक पाळीच्या दिवसात घ्यावयाची काळजी ,आहार,आरोग्य विषयी माहिती दिली.. मुख्यसेविका शितल गायकवाड मँडम यांनी ही मासिक पाळी विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. खरं सागांयचे तर आपले आरोग हिच खरी संपत्ती आहे आणि आपल्या निरोगी आरोग्या साठी आपली काळजी घेतली पाहिजे.. उपस्थित महिलांना राजाश्रय फाउंडेशन मार्फत मोफत सॅनिटरी नॅपकिन्स चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास राजश्रय फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ ज्ञान राजे, निलेश सर ,राजश्री देशमुख शिवराजे ज्योती ताई
प्रकाश देशमुख तसेच बालविकास प्रकल्प नागरी नाशिक अंतर्गत मनमाड येथील सर्व सेविका मदतनीस ताई व विभागातील महिला व किशोर वयीन मुली उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व सेविकाताई आणि मदतनीस ताई यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अन्नपूर्णा अडसुळे ताई यांनी केले. शितल गायकवाड मँडम यांनी मान्यवरांचे प्रकल्पाच्या वतीने आभार मानले कांचन भारंबे ताई,कल्पना बनकर ताई यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.


अजून बातम्या वाचा..

आत्मनिर्भर आणि विकसित भारताचं उद्दिष्ट २०४७ पर्यंत साध्य करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही एक चळवळ:- डॉ. भारती पवार

आत्मनिर्भर आणि विकसित भारताचं उद्दिष्ट २०४७ पर्यंत साध्य करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही एक चळवळ:- डॉ. भारती पवार

आज मनमाड मध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी...

read more
बघा व्हिडिओ-रापली हद्दीत रेल्वे चे दुहेरीकरणाचे काम शेतकर्यांनी पाडले बंद – रेल्वे अधिकाऱ्याने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप

बघा व्हिडिओ-रापली हद्दीत रेल्वे चे दुहेरीकरणाचे काम शेतकर्यांनी पाडले बंद – रेल्वे अधिकाऱ्याने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप

चांदवड तालुक्यातील रापली हद्दीत शेतकऱ्यांनी केले दुहेरीकरण रेल्वेचे काम केले बंद आज दि 09/01/2024...

read more
.