रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी येथे संततधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने दरड कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण अजूनही अडकल्याची भीती आहे.
इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाडीवर दरड कोसळून ही दुर्दैवी घटना दिनांक 19 जुलै 2023 रोजी रात्री घडली. यात अनेक घरे गाडली गेली, अजूनही ढिगाऱ्याखाली मृतदेह सापडण्याची शक्यता आहे. या वाडीत अंदाजे 25 ते 28 कुटुंबे वास्तव्यास होते. क्षणार्धात या आदिवासी कुटुंबाच्या संसाराची राख रांगोळी झाली. स्वप्ने मातीच्या ढिगाऱ्याखाली चिखलात गाडली गेली. ही मन हेलावणारी अत्यंत हृदयद्रावक घटना आहे. आपले मुलं, भाऊ,बहीण,आई,वडील,पती,पत्नी,नातेवाईक गमावून बसलेल्यांचा भावनांचा आक्रोश, स्रियांचा मन पिळवून टाकणारा टाहो फक्त या डोंगर कपारीत ऐकू येत आहे.
या दुर्दैवी घटनेत मृत्यू मुखी पडलेल्या आदिवासी बंधू भगिनींना फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली.
– देव हिरे. ( कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर,संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)
मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन
शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...











