loader image
[ays_poll id=7]

मनमाड वासीयांना सुखद बातमी : शहरात उभारले जाणार तीन जलकुंभ तर करंजवण येथील जॅकवेल चे १५ मीटर काम पूर्णत्वाकडे

Jul 25, 2023


मनमाड शहरासाठी जीवनदायी ठरणारी करंजवण योजनेचे काम प्रगतीपथावर असून करंजवण धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणात उभारल्या जाणाऱ्या जॅकवेलचे काम अर्ध्यावरच थांबवावे लागले असले तरी योजने अंतर्गत शहरात उभारल्या जाणाऱ्या ३ नव्या जलकुंभाचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. करंजवण धरणावर उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे.

मनमाड शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदार सुहास कांदे विशेष प्रयत्न करत आहे. करंजवण धरणात २७ मीटर उंच व ८ मीटर रुंदीची जॅकवेल (विहीर) उभारण्याचे काम सुरु झालेले असून पैकी १५ मीटर उंचीचे काम झालेले आहे. उरलेल्या १२ मीटरचे कामास अर्धवट सोडावे लागले आहे. करंजवण धरणात पावसाचे पाण्याचा साठा वाढल्याने झालेल्या १५ मीटरच्या कामापर्यंत पाणी पोहचले आहे. त्यामुळे हे काम थांबवावे लागले आहे. या योजनेअंतर्गत मनमाड शहरातील माऊली नगर, मुरलीधर नगर आणि जयजवान ढाब्यालगतच्या वसाहतीत प्रत्येकी एक जलकुंभ उभारण्याचा कामाला ठेकेदार कंपनीकडून सुरुवात करण्यात येणार असून येत्या ५-६ दिवसात पहाणी व प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.

करंजवण धरणावर उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या जागेबाबतचे प्रस्ताव पाटबंधारे व त्याच्याशी संबंधित विभागाकडे मंजूरीसाठी पाठविलेले असून येत्या १५-२० दिवसात त्यास मंजूरी मिळून करारनामा करण्यासाठी हालचाली सुरु झालेल्या आहेत. लवकरच हा करार होत असून करंजवण योजनेतील महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. आत्तापर्यंतच्या सर्व घडामोडी ह्या ठरल्याप्रमाणेच होत असून योजनाही ठरलेल्या मुदतीत कार्यान्वयीत होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नामुळे शहराला जीवनदायी ठरणारी ३१२ कोटी रुपयांच्या करंजवण योजनेचे भूमिपूजन झाल्यानंतर तत्काळ जलद गतीने कामकाज सुरू असून लवकरात लवकर योजना पूर्ण करण्यासाठी आमदार सुहास कांदे प्रयत्नशील आहे.

जलवाहिनी टाकण्यासाठी २० स्पॉटपैकी १२ ते १५ ठिकाणी गॅप भरुन पुर्ण करण्याचे काम वेगाने होत आहे. मानसी रोज १३५ लिटर पाणी मिळण्यासाठी एकूण १५ लहान-मोठ्या टाक्या बनविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जलवाहिनी योजना ही ऑईल कंपन्यांप्रमाणे – कंप्युटरराईज फायबर ऑप्टिकलने नियंत्रित राहणार आहे. त्यामुळे कुठेही एक थेंब पाण्याची गळती झाल्यास लगेच माहिती मिळणार आहे. त्यामुळे जलवाहिनीतून पाणी चोरणे अशक्य होणार आहे..


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – नांदगाव रेल्वेगेट वरील अंडर बायपास मध्ये दुष्काळात सुद्वा पाणीच पाणी

बघा व्हिडिओ – नांदगाव रेल्वेगेट वरील अंडर बायपास मध्ये दुष्काळात सुद्वा पाणीच पाणी

नांदगाव सोमनाथ घोगांणेनांदगाव शहरात कडक दुष्काळ असतानांही रेल्वे गेट जवळील अंडर बायपास मध्ये...

read more
दुष्काळसदृश्यते च्या उपाययोजनेसाठी मंडळनिहाय आर्थिक तरतुदींसाठी मागणी नोंदवली तरच उपयोग – महेद्र बोरसे

दुष्काळसदृश्यते च्या उपाययोजनेसाठी मंडळनिहाय आर्थिक तरतुदींसाठी मागणी नोंदवली तरच उपयोग – महेद्र बोरसे

नांदगाव सोमनाथ घोगांणेशासन निर्णय एससीवाय २०२३/प्र. क्र.३७/म-७ दि.१० नोव्हेंबर २०२३ नुसार...

read more
.