loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत कवी रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी साजरी

Aug 8, 2023


कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये कवी रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे यांच्या हस्ते कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर,उपप्राचार्य वैभव कुलकर्णी, विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते.
कवी रवींद्रनाथ टागोर हे भारताचे एक थोर सुपुत्र बंगालमधील एका संपन्न सुविद्य घरात इसवी सन 1861 मध्ये रवींद्रनाथांचा जन्म झाला त्यांना लहानपणापासूनच निसर्गाची जबरदस्त ओढ होती त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच झाले . त्यांना शाळेतील बंदिस्त वातावरण आवडत नसे. अगदी लहानपणापासून ते कविता करत असत.
रवींद्रनाथांच्या काव्य प्रतिभेने त्यांना जगविख्यात केले. रवींद्रनाथांच्या गीतांजली ला नोबेल पुरस्कार मिळाले. रवींद्रानी इतरही विपुल लेखन केले. शिक्षणाबद्दल रविंद्रांचे फार वेगळे विचार होते.कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता चौथी व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. इयत्ता चौथीची हर्षाली इमले,अवनी खैरनार,टीया छाबरिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
इयत्ता नववीचे सृष्टी सांगळे हिने आपले विचार मांडले. या विद्यार्थ्यांना सचिन बिडवे, सौ पंचशीला पगारे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हर्षदा कुदळे वृंदा शर्मा यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

एकनाथ महाराज धार्मिक , सांस्कृतिक आणि अध्यात्मिक असे संपन्न व्यक्तिमत्त्व – हभप सदगीर महाराज

एकनाथ महाराज धार्मिक , सांस्कृतिक आणि अध्यात्मिक असे संपन्न व्यक्तिमत्त्व – हभप सदगीर महाराज

  मनमाड : (योगेश म्हस्के) येथे आयोजित करण्यात आलेल्या संस्कृती संवर्धन समिती आयोजित स्वामी...

read more
आत्मनिर्भर आणि विकसित भारताचं उद्दिष्ट २०४७ पर्यंत साध्य करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही एक चळवळ:- डॉ. भारती पवार

आत्मनिर्भर आणि विकसित भारताचं उद्दिष्ट २०४७ पर्यंत साध्य करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही एक चळवळ:- डॉ. भारती पवार

आज मनमाड मध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी...

read more
बघा व्हिडिओ-रापली हद्दीत रेल्वे चे दुहेरीकरणाचे काम शेतकर्यांनी पाडले बंद – रेल्वे अधिकाऱ्याने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप

बघा व्हिडिओ-रापली हद्दीत रेल्वे चे दुहेरीकरणाचे काम शेतकर्यांनी पाडले बंद – रेल्वे अधिकाऱ्याने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप

चांदवड तालुक्यातील रापली हद्दीत शेतकऱ्यांनी केले दुहेरीकरण रेल्वेचे काम केले बंद आज दि 09/01/2024...

read more
.