loader image
[ays_poll id=7]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्या संदर्भात रिपाइंचे शहराध्यक्ष महाविर जाधव यांचे नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन.!

Aug 14, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा ही तमाम आंबेडकरी अनुयायी यांची फार वर्षांपूर्वीची मागणी आहे.

सविस्तर वृत्त असे की मुख्य नांदगाव शहरातील बाजार पेठेत प्रवेश करतांना समोरच सिंबॉल आॅफ नॉलेज,द ग्रेटेस नंबर वन इंडियन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पवित्र दर्शन होते शहरातील प्रवेश मार्गालाच सुंदर आकर्षक भव्य-दिव्य अशी सुशोभीकरण करुन पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा ही मागणी अनेक वर्षांपासून नांदगाव शहरातील आंबेडकर अनुयायी यांची प्रलंबित आहे मनमाड येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे त्याच पद्धतीने नांदगाव शहरातील नगरपालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण व सुशोभीकरण झाले तसेच शिवसृष्टी मोठ्या प्रमाणात जलदगतीने काम चालू आहे. नांदगाव शहरात मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक थोर महापुरुषांच्या पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम सुरू असुन अहिल्यादेवी होळकर यांचे देखील पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम चालू आहे याच पद्धतीने बौध्द समाजातील बांधवांचा देखिल आनंद द्विगुणित व्हावा यासाठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील पूर्णा कृती पुतळ्याचे काम लवकर व्हावे,ही समस्त आंबेडकरी जनतेची मागणी आहे.असे निवेदन आज रिपाइंच्या वतीने मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे व लवकरात लवकर आमच्या मागणीला न्याय मिळाला अशी अपेक्षा व्यक्त करुन रिपाइंच्या वतीने विनंती करण्यात आली आहे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी रिपाइंचे शहराध्यक्ष महावीर जाधव,गौतम काकळीज प्रशांत गरूड,किरण पवार, सोहेल रंगरेज,राज पवार, दिपक मोरे,जफर शेख, सोमनाथ चौधरी,निलेश जाधव यादींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

मनमाड बस डेपोत  इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड बस डेपोत इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड इंधन बचाव ही काळाची गरज असून पुढच्या पिढीसाठी इंधन साठा राहील, हा विचार करून इंधनाचा...

read more
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

त्रंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम कार्यक्रम...

read more
तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

न्यायडोंगरी (प्रतिनिधी) न्यायडोंगरीच्या अगदी मध्यभागातून जाणारी मध्य रेल्वेची भुसावळ मुंबई भुसावळ...

read more
.