loader image
[ays_poll id=7]

वाहनांच्या रहदारी ने नांदगावकर त्रस्त

Dec 19, 2023


नांदगाव : मारूती जगधने नांदगाव शहरातुन अवजड वाहनांच्या रहदारीने नागरीक व पोलिस प्रशासन ञस्त झाले आहे मुख्य रस्त्यावरून अवजड वाहनामुळे ध्वनी,वायु,व धुळीचे प्रदुषण वाढत आहे .तसेच शहारतील रेल्वेभुयारी मार्गाच्या तोंडावर बेकायदेशीर वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे .भुयारी मार्गात बेकायदेशीर पार्कींगने वाहन धारकाना सतत वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे .भुयारी मार्गातील बेकायदेशीर पार्किग वाहने हाटविण्यात. यावी अशी मागणी होत आहे .
तर दुसरी कडे शहरातील ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर लावलेल्या वाहनामुळे वाहतूक कोंडी होत आहे शहरातील शाकंबरी पुलावर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे शहरातील बेकायदेशीर पार्किंग वर नियमित कारवाई करावी .सध्या अवजड वाहनामुळे वायु प्रदूषण, ध्वनि प्रदूषण होत आहे मोठे वाहन धारक कित्येक वेळा पर्यंत कर्कष हॉर्ण वाजत जातात या मुळे कानठिळ्या बसतात यात तेल, गॅस वाहतूक करणार्या वाहनांचा समावेश आहे ? ते बिनबोभाट वाहन पळवत कर्कष हाॅर्ण वाजवत असतात शिवाय वाहनामुळे उडणारी धुळ देखील प्रचंड प्रमाणात आहे .या विविध समस्यांनी नांदगाव चे रहिवाशी ञस्त झाले आहे .


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
.