मनमाड – येथील मे. जयमातादी व्हेजिटेबल कंपनी व मे. भारतीबाई शिवनाथ जाधव यांनी शेतकरी बांधवांचे थकविलेल्या रक्कमेसंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीकडे दाखल केलेल्या तक्रारदार 95 शेतकऱ्यांची शेतमालाची थकलेली रक्कम बाजार समितीद्वारे आज रविवार दि. 28/04/2024 रोजी दुपारी 03.00 वाजता त्या-त्या शेतकरी बांधवांना वाटप करण्यात आली. यावेळी शेतकरी बांधवांना ऐन दुष्काळाच्या अडचणीत त्यांची थकलेली रक्कम मिळाली म्हणुन त्यांनी समाधान व्यक्त केले आणि बाजार समितीचे सभापती व सत्ताधारी संचालक मंडळाचे कौतुक केले. यावेळी बाजार समितीचे सभापती दिपक चंद्रकांत गोगड, उपसभापती आनंदा विठ्ठल मार्कंड, संचालक गंगाधर हरी बिडगर, गणेश जगन्नाथ धात्रक, कैलास नामदेव भाबड, पुंजाराम पोपट आहेर, योगेश दुर्योधन कदम, सुभाष जयराम उगले, किसनलाल कन्हैयालाल बंब, रुपेशकुमार रिखबचंद ललवाणी तसेच अशोक रुंझा पाटील व रमेश कोंडाजी कराड आणि समस्त शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन
शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...











