loader image

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

May 6, 2024


मनमाड – उबाठा गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी काल रात्री अनेक पदाधिकाऱ्यांसह उशिरा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी यांच्यासह उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, माजी नगरसेवक भगवान ओशेटे, भगूर शहरप्रमुख विक्रम सोनवणे, इगतपुरी पंचायत समिती सभापती रंगनाथ कचरे, इगतपुरी युवासेना तालुकाप्रमुख मोहन बऱ्हे, जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार तसेच भगूर, इगतपुरी, शिरसाळे विभागातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला. गेली १२ वर्षे शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता ते जिल्हाप्रमुख असा प्रवास केला होता, मात्र लोकसभेची उमेदवारी देण्याबाबत माझ्याशी असा दगाफटका केला जाईल याची मला कल्पना नव्हती. उबाठा गट मुख्यमंत्री साहेबांना गद्दार म्हणत असला तरीही प्रत्यक्षात या गटातीलच दोन तीन गद्दार लोकांनी पक्षाचे वाटोळे केले असून तेच खरे गद्दार आहेत. उबाठा गटात आपल्याला न्याय मिळू शकला नाही त्यामुळे आता वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे करंजकर यांनी यावेळी सांगितले. दुसरीकडे, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणे उबाठा यांनी केव्हाच सोडून दिले असून कार्यकर्त्यांला येणाऱ्या अडचणींशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. फक्त मी आणि माझे कुटूंबीय एवढाच संकुचित विचार ते करतात. त्यांच्या याच विचारामुळे पक्षाचे अतोनात नुकसान झाले असून अनेक लोकं पक्ष सोडून गेले. ५० आमदार, १३ खासदार आणि असंख्य पदाधिकारी पक्ष सोडून जात असले तरीही एका माणसाला त्याचा काहीही फरक पडत नाही. त्यामुळे करंजकर यांचे पक्षात स्वागत करत असून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी ते जोमाने कामाला लागतील अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यासमयी व्यक्त केली. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक आणि सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, माजी नगरसेवक अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे तसेच नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

त्रंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम कार्यक्रम...

read more
तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

न्यायडोंगरी (प्रतिनिधी) न्यायडोंगरीच्या अगदी मध्यभागातून जाणारी मध्य रेल्वेची भुसावळ मुंबई भुसावळ...

read more
“संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” अंतर्गत नांदगाव तालुक्यासाठी ऊस तोड पालकांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह मंजूर

“संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” अंतर्गत नांदगाव तालुक्यासाठी ऊस तोड पालकांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह मंजूर

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने नांदगाव तालुक्यातील ऊस तोड कामगार पालकांच्या...

read more
श्री गणेश ज्वेलर्सचे बुधवारी उद्घाटन – सिने अभिनेत्री गिरिजा प्रभु प्रमुख आकर्षण

श्री गणेश ज्वेलर्सचे बुधवारी उद्घाटन – सिने अभिनेत्री गिरिजा प्रभु प्रमुख आकर्षण

सुमारे दोन दशकांपासून मनमाड शहर आणि परिसरातील ग्राहकांसाठी सोने,चांदीच्या दागिन्यांच्या विविध...

read more
आ.सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते मनमाड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

आ.सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते मनमाड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

  मनमाड - रविवार 14/01/2024 मनमाड शहरात नगरोत्थान विकास विभागाच्या योजनेअंतर्गत विकास कामांचे...

read more
.