loader image
[ays_poll id=7]

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

Dec 8, 2025


. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन इ.सहावी.व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. इयत्ता सहावीचे साई चौधरी.ओम चौधरी इयत्ता दुसरीचा आर्यन काझीकर. साई मेहेत्रे या विद्यार्थ्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपले विचार प्रकट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत त्यांनी दीन दलितांना न्याय मिळवून दिला ते न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी आणि समाज सुधारक होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ज्यामध्ये सर्वांना समानता. स्वातंत्र्य आणि न्याय सुनिश्चित केला गेला. त्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले आणि लोकांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतीकारक संदेश त्यांनी सर्वसामान्य ना दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य आम्हाला संपूर्ण प्रेरणादायी आहे. जगासाठी शून्यातून केली सुरुवात.अमर झाले इतिहासात आंबेडकरांचे त्यांचे नाव आपल्या सर्वांचे असे भिमराव त्यांनी दीनदलितांचा उद्धार केला. जीवाचे रान भारतीय राज्य संघटनेचे शिल्पकार ते भारतीय संविधान केला चवदार तळ्याचा सत्याग्रह मनुस्मृतीचे केले दहन अशा या महामानवाला डॉ .बाबासाहेब आंबेडकरांना करतोय कोण होते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थ बा- बाणेदार ते स्वभावाने बा-बारकाईने अभ्यास करणारे सा- साधक ते बौद्ध धर्माचे.हे- हेतू ज्यांचा सर्वसामान्यांचा विकासाचा ब-बदल समाजात घडवून आणणारे.आ- आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणिला बे -बेधडक सत्याग्रह केला चवदार तळ्यावर ड-डगमगले नाही संकटे आल्यावर क-कते समाज उन्नतीचे र-रचियते भारतीय संविधानाचे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनेक वर्ष चतुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव त्यांना खायला भाकरी प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते अशा दिन दलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता. प्रकाशाचा किरणे पुसण्या त्यांचे अश्रू देण्या दीन दलितांना नवसंजीवन अवतरला एक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अशा या महामानवाचा युगप्रवर्तकाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील महु या गावी 14 एप्रिल १८९१ रोजी झाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला .तो त्यांच्या वडिलांमुळे रामजीमुळे संविधान निर्मितीचा आसमंत ठरला यातील मात्र शंका नाही मुळातच अभ्यासाची आवड असल्याने डॉ. आंबेडकरांनी मास्टर ऑफ सायन्स डॉक्टर संपादन केल्या मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचे सहज आलेख आवडतो शिक्षण ही वाघिणीचे दूध आहे आणि हे जो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे मौलिक विचार त्यांनी सांगितले संघटित व्हा संघर्ष करा हा क्रांतिकारक संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांना पानवट्यावर पाणी भरण्याचा पाणी पिण्याचा अधिकार नव्हता त्यापैकी एक होते महाड येथील चवदार तळे तेथील स्पृश्य लोक अस्पृश्यांना पाणी भरू देत नव्हते. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च 1927 रोजी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला त्यानंतर अनुतायांनी चवदार तळ्याचे पाणी पिले त्यांच्या सर्व समस्या संस्कृती निर्माण झालेले आहे म्हणून 25 डिसेंबर रोजी आंबेडकरांनी मनुस्मृति या ग्रंथाचे दहन केले भारतीय संविधान लिहिण्याचे महान कार्य बाबासाहेब यांनी केले अशा या महामानवाचे ६डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले अशा शब्दात विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. या विद्यार्थ्यांना अमिता झाडे सौ ऋचा सोनवणे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांची शेजवळ यश बागुल या विद्यार्थ्यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.