loader image
[ays_poll id=7]

केंद्राचा अर्थसंकल्प यंदा ‘रविवारी’ सादर होणार!!

Jan 8, 2026


नुकतीच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षेतखाली कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्सनं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी दिली आहे.

संसदेच्या कॅलेंडरनुसार वित्त मंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2026 ला म्हणजेच रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सादर करतील. अलीकडच्या काळात रविवारी अर्थसंकल्प सादर करण्याची पहिलीच वेळ आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं होईल. त्याच्या पुढच्याच दिवशी म्हणजे 29 जानेवारीला आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर केला जाईल. ज्यातून अर्थसंकल्पापूर्वी देशाच्या आर्थिक स्थिचीचं चित्र समोर मांडलं जाईल.

यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात आयोजित केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कामकाज 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत कामकाज सुरु राहील.त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामकाज 9 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान असेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2026 ला देशाचा 88 वा अर्थसंकल्प सादर करतील. 2017 पासून 1 फेब्रुवारी रोजी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला जात आह. यापूर्वी केंद्राचा अर्थसंकल्प 28 फेब्रुवारीला सादर केला जात होता. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यकाळात अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलण्यात आली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्या सलग 9 वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री ठरतील. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी त्यांच्या दोन कार्यकाळात 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. तर, दुसरीकडे पी. चिदंबरमन यांनी नऊ वेळा अर्थ संकल्प सादर केला आहे. तर, प्रणव मुखर्जी यांनी 8 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड बस डेपोत  इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड बस डेपोत इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड इंधन बचाव ही काळाची गरज असून पुढच्या पिढीसाठी इंधन साठा राहील, हा विचार करून इंधनाचा...

read more
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

त्रंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम कार्यक्रम...

read more
तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

न्यायडोंगरी (प्रतिनिधी) न्यायडोंगरीच्या अगदी मध्यभागातून जाणारी मध्य रेल्वेची भुसावळ मुंबई भुसावळ...

read more
“संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” अंतर्गत नांदगाव तालुक्यासाठी ऊस तोड पालकांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह मंजूर

“संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” अंतर्गत नांदगाव तालुक्यासाठी ऊस तोड पालकांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह मंजूर

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने नांदगाव तालुक्यातील ऊस तोड कामगार पालकांच्या...

read more
.