loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

Jan 12, 2026


मनमाड येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकनंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.इं दोर येथील प्रसिद्ध उद्योजक श्री.विवेक देशपांडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील यांनी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या, हिंदवी स्वराज्याची संकल्पना देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना केवळ युद्धकलाच शिकवली नाही, तर न्याय, नीती आणि स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण दिली. एवढेच नव्हे तर शिवराय मोहिमेवर असताना स्वराज्याचा कारभार अतिशय कुशलतेने पाहणाऱ्या त्या एक आदर्श प्रशासक होत्या. आजच्या काळात जिजाऊंचे विचार अधिक महत्त्वाचे आहेत. “प्रत्येक घरात एक जिजाऊ जन्माला आली, तरच प्रत्येक घरात एक शिवाजी घडेल.” आजच्या स्त्रियांनी जिजाऊंचा स्वाभिमान आणि धडाडी अंगी बाळगणे आवश्यक आहे.

भारत हा युवकांचा देश आहे. भारतीय संस्कृती जगात पोहचविणारे स्वामी विवेकानंद हे आजच्या युवकांचे आदर्श असले पाहिजे. त्यांनी पाश्चात्य जगाला भारतीय संस्कृती आणि वेदांची खरी ओळख करून दिली. त्यांनी केवळ धर्मावरच नव्हे, तर मानवाच्या उद्धारावर अधिक भर दिला.त्यांच्या मते, शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर माणसाच्या चारित्र्याचा विकास होय. तुम्हाला जर स्वतःवर विश्वास नसेल, तर तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही, असे त्यांचे मत होते.आत्मविश्वास हाच यशाचा खरा मार्ग आहे. आजच्या काळात जेव्हा आपण छोट्या संकटांनी खचून जातो, तेव्हा त्यांचे विचार आपल्याला बळ देतात. “शंभर वेळा अपयश आले तरी पुन्हा एकदा प्रयत्न करा,” हा त्यांचा सल्ला आजही तितकाच लागू होतो.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.आर.पावडे यांनी केले. कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी.एस. देसले, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. डी.व्ही सोनवणे, प्रा. एस.जी.सुखदेवे, डॉ. संजय चिंचोले, महाविद्यालायचे कुलसचिव समाधान केदारे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी प्रा.शरद वाघ यांनी परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

  ढेकू ( प्रतिनिधी ) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
.