loader image
[ays_poll id=7]

न्यू इंग्लिश स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

Jan 13, 2026


(नांदगाव : सुमितकुमार जगधने ) :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी करण्यात आली. उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

“जिजाऊंच्या जीवावर नाही कुणाची पर्वा” हे भावस्पर्शी गीत काव्यांजली देशमुख व श्रावणी काकड यांनी सादर केले. त्यांना संगीतसाथ कल्पना आहिरे यांनी दिली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊंची वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले.

राजमाता जिजाऊंनी केवळ एका राजाला जन्म दिला नाही, तर स्वराज्याचा विचार या मातीत रुजवला. अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द त्यांनी शिवरायांमध्ये निर्माण केली. त्या सामान्य जनतेच्या समस्या स्वतः न्यायनिवाडा करून सोडवत असत. त्या स्त्रीशक्तीचे प्रतीक व सक्षम मार्गदर्शक होत्या, असे मनोगत उपशिक्षिका स्मिता केदारे यांनी व्यक्त केले.

उपशिक्षक ज्ञानेश्वर पगार यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितले की, भारत सरकारने १९८४ पासून १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संस्कृती, अध्यात्म व राष्ट्रप्रेमाचा जगभर प्रसार करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंद होत. त्यांनी १८९७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली असून “शिवभावे जीवसेवा” हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. शिक्षण म्हणजे केवळ माहिती संकलन नसून माणूस घडविणे आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच “जेवढा मोठा संघर्ष, तेवढाच विजय भव्य” हा मोलाचा संदेश त्यांनी तरुणांना दिला.

उपशिक्षिका सुनिता जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, राजमाता जिजाऊंचे आयुष्य केवळ इतिहास नसून येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श आहे. ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम या सत्त्वगुणांचे संस्कार त्यांनी छत्रपती शिवरायांवर केले, असे त्यांनी नमूद केले.

पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार मांडताना “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका” तसेच “जीवनात जोखीम पत्करा; जिंकलात तर नेतृत्व करा, हारलात तर इतरांना मार्ग दाखवा” हे विचार विद्यार्थ्यांसमोर ठेवले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आहेर यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला.  जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला. जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

  मुंबई,-- महाराष्ट्र सरकारच्या नव्याने आणलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील दक्ष पाटिल, हसन शेख, रुषी शर्मा, चिराग निफाडकर व रोहित पवार यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील दक्ष पाटिल, हसन शेख, रुषी शर्मा, चिराग निफाडकर व रोहित पवार यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.