loader image
[ays_poll id=7]

मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७ फेब्रुवारी रोजी.

Feb 24, 2026


मराठी भाषा गौरव दिनानिमिताने कार्यक्रम
मनमाड(प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघाने आयोजित केलेल्या काव्यस्पर्धेची
अंतिम फेरी व पारितोषिक वितरण समारंभ येत्या शुक्रवारी मराठी भाषा गौरव दिनी २७/ फेब्रुवारी /२०२६रोजी सायं.५-०० वा. सितालक्ष्मी हॉल, छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, मनमाड येथे संपन्न होणार असून मनमाड साहित्य संघाचे अध्यक्ष मा.प्राचार्य श्री. सदाशिव सुतार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात २०० विद्यार्थ्यांमधून प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत निवड करण्यात आलेले मनमाड शहरातील विविध शाळांतील १४ बाल-कुमार कवी-कवयित्री आपल्या कविता सादर करतील. त्यातून पाच बाल-कुमार कवी-कवयित्रींना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व गौरवपत्र मान्यवर पाहुण्यांचा हस्ते दिले जाणार आहे.
या कार्यक्रमास अंतिम फेरीसाठी निवड झालेले विद्यार्थी, शाळेचे काव्यस्पर्धा समन्वयक शिक्षक,मान्यवर मुख्याध्यापक व पालक यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन मनमाड साहित्य संघाने केले आहे.
शहरातील सर्वच माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मनमाड शहरातील साहित्यिक चळवळीस या उपक्रमामुळे गती मिळेल व विद्यार्थामधील सृजनशीलता वाढीस लागेल अशी अपेक्षा साहित्य-रसिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.