loader image
[ays_poll id=7]

डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याच्या समावेशासाठी भुजबळांचे केंद्राला साकडे

Sep 7, 2026


नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (DMIC) दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांना सविस्तर पत्र पाठवले आहे.
२०१३-१४ मध्ये डीएमआयसीच्या पहिल्या टप्प्याची आखणी होताना नाशिकमध्ये उद्योगांसाठी पाण्याची उपलब्धता आणि आरक्षणाबाबत अडचणी होत्या, हे भुजबळ यांनी पत्रात मान्य केले आहे. मात्र, गेल्या दशकभरात परिस्थिती बदलली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नाशिक हा धरणांचा जिल्हा असल्याचे नमूद करताना केवळ जुन्या कारणांमुळे जिल्ह्याला या प्रकल्पापासून वंचित ठेवता येणार नाही, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. नियोजित औद्योगिक पाणीवाटप, जलसंधारण आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर यांसारख्या उपायांद्वारे पाण्याचा प्रश्न सोडवता येऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

गेल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून...

read more
बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

  नाशिक,दि.१८ जून :- ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी वडीगोद्री येथे प्रा.लक्ष्मण हाके व त्यांचे...

read more
वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

शाळांची इमारत मंदिरच समजले पाहिजे, कारण या ठिकाणी कुठल्याही जातीपातीचा,धर्माचा विद्यार्थी...

read more
शेतकऱ्यांना वाढीव दराने  बी बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ना.भुसे यांचे निर्देश

शेतकऱ्यांना वाढीव दराने बी बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ना.भुसे यांचे निर्देश

मनमाड : नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने...

read more
.