loader image
[ays_poll id=7]

भारत-पाक सामना होणारच – BCCI !

Oct 20, 2021


संपूर्ण देशभरातून विरोध होत असलेल्या  टी-20 विश्वचषकातील भारत-पाक सामना नियोजित तारखेलाच होणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

टी-20 विश्वचषक ग्रुप स्टेजमधील सामन्यांचा थरार युएईत सुरु झाला आहे तर भारत असलेल्या सुपर 12 गटाचे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. भारताची पहिलीच लढत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत होत आहे. परंतु या सामन्यावर बंदीचं सावट होतं. गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये वाढलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव खूपच  वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी -20 विश्वचषक सामना रद्द करण्याची मागणी अनेक राजकीय नेत्यांसह विविध संघटनांनी केली होती. मात्र कोणत्याही परिस्थितीत भारत पाकिस्तान सामना होणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

टी -20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 5 सामने झाले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने सर्व पाच सामने जिंकले आहेत.


अजून बातम्या वाचा..

दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी व पोलीस कर्मचारी शहीद – अनंतनाग येथील घटना

दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी व पोलीस कर्मचारी शहीद – अनंतनाग येथील घटना

  जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी, पोलीस ठार...

read more
नांदगाव तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत संत झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत संत झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड :शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा...

read more
मनमाड येथे रविवारी रंगणार जिल्हास्तरीय बास्केट बॉल स्पर्धा – संत झेविअर हायस्कूल चा पुढाकार

मनमाड येथे रविवारी रंगणार जिल्हास्तरीय बास्केट बॉल स्पर्धा – संत झेविअर हायस्कूल चा पुढाकार

मनमाड : झेवियर्स स्पोट् र्स क्लब मनमाड व प्रिन्सी मेमोरियल फाउंडेशन( पुणे)द्वारा आयोजित...

read more
.