loader image
[ays_poll id=7]

शेती पंपांची सक्तीची वसुली थांबवावी : सरपंच सेवा महासंघाची मागणी !

Nov 29, 2021


यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी सर्व बाजूनी होरपळून निघाला आहे, त्यातच महावितरण कडून सक्तीची वसुली सुरु असल्यामुळे शेतकरी अजूनच हलाकीच्या परीस्तीतीतून जात आहे, तरी महावितरण कडून होणारी सक्तीची वसुली त्वरित थांबविण्यात येवून शेतकर्यांना शासनाने दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन सरपंच शेतकरी महासंघातर्फे देविदास उगले यांनी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना दिले आहे.

शेतकरी बांधवाना शेती पंपासाठी ३ फेज लाईटची गरज असते, महावितरण शेती पंपासाठी रात्री उशिरा लाईट उपलब्ध करून देते आणि ती सुद्धा ये-जा करत असते. दिवसा सिंगल फेज सुद्धा लाईट नियमित उपलब्ध नसते, या आणि यासारख्या अनेक समस्यांना शेतकरी दररोज सामोरे जात आहे, तरी शासनाने शेतकरी हितासाठी योग्य निर्णय घ्यावा, असे देखील निवेदनात म्हटले आहे.


अजून बातम्या वाचा..

चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी दिली कातरवाडी दुष्काळ भागात भेट

चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी दिली कातरवाडी दुष्काळ भागात भेट

चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे जन संवाद यात्रेत माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल कृषी उत्पादन बाजार...

read more
*सिद्धी क्लासेसच्या संचालिका सौ दराडे यांना एक्सलन्स इन कोचिंग क्लासेस हा पुरस्कार प्रदान.

*सिद्धी क्लासेसच्या संचालिका सौ दराडे यांना एक्सलन्स इन कोचिंग क्लासेस हा पुरस्कार प्रदान.

मनमाड मधील सुप्रसिद्ध सिद्धी क्लासेस च्या संचालिका सौ भाग्यश्री भागवत दराडे यांना महाराष्ट्र राज्य...

read more
सरकारची ” मेरा बिल मेरा अधिकार ” योजना. खरेदी करा , पक्के बिल घ्या अन् जिंका एक कोटी रुपयांपर्यंत रोख बक्षिसे!

सरकारची ” मेरा बिल मेरा अधिकार ” योजना. खरेदी करा , पक्के बिल घ्या अन् जिंका एक कोटी रुपयांपर्यंत रोख बक्षिसे!

  आपल्यातील बऱ्याच जणांना कुठलेही सामान विकत घेतल्यावर विक्रेत्यांकडून बिल घेण्याची सवय असते....

read more
.