मालवाहतूक करणाऱ्या किसान एक्स्प्रेस रेल्वे चे दोन डबे रुळावरून घसरल्याने अपघात घडला असून कोणतीही जीवितहानी या अपघातात झालेली नाही. पुणे येथून दानापुर कडे जात असताना हा अपघात झाला आहे.नगरचौकी गेट जवळून ही एक्स्प्रेस जात असताना सदरील अपघात घडला.गाडीचा वेग कमी होता त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.या अपघातानंतर रेल्वेचे अधिकारी आणि तांत्रिक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळित झाली. गत पंधरा दिवसातील हा दुसरा अपघात आहे.
बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला
मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...











