loader image
[ays_poll id=7]

मनमाड वासीयांना सुखद बातमी : शहरात उभारले जाणार तीन जलकुंभ तर करंजवण येथील जॅकवेल चे १५ मीटर काम पूर्णत्वाकडे

Jul 25, 2023


मनमाड शहरासाठी जीवनदायी ठरणारी करंजवण योजनेचे काम प्रगतीपथावर असून करंजवण धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणात उभारल्या जाणाऱ्या जॅकवेलचे काम अर्ध्यावरच थांबवावे लागले असले तरी योजने अंतर्गत शहरात उभारल्या जाणाऱ्या ३ नव्या जलकुंभाचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. करंजवण धरणावर उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे.

मनमाड शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदार सुहास कांदे विशेष प्रयत्न करत आहे. करंजवण धरणात २७ मीटर उंच व ८ मीटर रुंदीची जॅकवेल (विहीर) उभारण्याचे काम सुरु झालेले असून पैकी १५ मीटर उंचीचे काम झालेले आहे. उरलेल्या १२ मीटरचे कामास अर्धवट सोडावे लागले आहे. करंजवण धरणात पावसाचे पाण्याचा साठा वाढल्याने झालेल्या १५ मीटरच्या कामापर्यंत पाणी पोहचले आहे. त्यामुळे हे काम थांबवावे लागले आहे. या योजनेअंतर्गत मनमाड शहरातील माऊली नगर, मुरलीधर नगर आणि जयजवान ढाब्यालगतच्या वसाहतीत प्रत्येकी एक जलकुंभ उभारण्याचा कामाला ठेकेदार कंपनीकडून सुरुवात करण्यात येणार असून येत्या ५-६ दिवसात पहाणी व प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.

करंजवण धरणावर उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या जागेबाबतचे प्रस्ताव पाटबंधारे व त्याच्याशी संबंधित विभागाकडे मंजूरीसाठी पाठविलेले असून येत्या १५-२० दिवसात त्यास मंजूरी मिळून करारनामा करण्यासाठी हालचाली सुरु झालेल्या आहेत. लवकरच हा करार होत असून करंजवण योजनेतील महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. आत्तापर्यंतच्या सर्व घडामोडी ह्या ठरल्याप्रमाणेच होत असून योजनाही ठरलेल्या मुदतीत कार्यान्वयीत होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नामुळे शहराला जीवनदायी ठरणारी ३१२ कोटी रुपयांच्या करंजवण योजनेचे भूमिपूजन झाल्यानंतर तत्काळ जलद गतीने कामकाज सुरू असून लवकरात लवकर योजना पूर्ण करण्यासाठी आमदार सुहास कांदे प्रयत्नशील आहे.

जलवाहिनी टाकण्यासाठी २० स्पॉटपैकी १२ ते १५ ठिकाणी गॅप भरुन पुर्ण करण्याचे काम वेगाने होत आहे. मानसी रोज १३५ लिटर पाणी मिळण्यासाठी एकूण १५ लहान-मोठ्या टाक्या बनविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जलवाहिनी योजना ही ऑईल कंपन्यांप्रमाणे – कंप्युटरराईज फायबर ऑप्टिकलने नियंत्रित राहणार आहे. त्यामुळे कुठेही एक थेंब पाण्याची गळती झाल्यास लगेच माहिती मिळणार आहे. त्यामुळे जलवाहिनीतून पाणी चोरणे अशक्य होणार आहे..


अजून बातम्या वाचा..

नांदगाव महाविद्यालयात विद्यार्थी खळखळून हसले आणी तणाव मुक्त झाले ./ गुनवंत विद्यार्थ्याचा सन्मान

नांदगाव महाविद्यालयात विद्यार्थी खळखळून हसले आणी तणाव मुक्त झाले ./ गुनवंत विद्यार्थ्याचा सन्मान

नांदगाव : मारुती जगधने अनमोल क्षणांचा आनंद घ्या नाराज होऊ नका ध्येयाची वाटचाल निश्चित करा यश तुमचे...

read more
आ.सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने मनमाड शहर शिवसेनेतर्फे बौद्ध विधी उपासक (बौद्धाचार्य) यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान

आ.सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने मनमाड शहर शिवसेनेतर्फे बौद्ध विधी उपासक (बौद्धाचार्य) यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मनमाड शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 7...

read more
आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय, दिव्यांग सशक्तिकरण विभागाअंतर्गत जिल्हा...

read more
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

मनमाड - अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा...

read more
.