loader image
[ays_poll id=7]

न्यू इंग्लिश स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

Jan 13, 2026


(नांदगाव : सुमितकुमार जगधने ) :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी करण्यात आली. उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

“जिजाऊंच्या जीवावर नाही कुणाची पर्वा” हे भावस्पर्शी गीत काव्यांजली देशमुख व श्रावणी काकड यांनी सादर केले. त्यांना संगीतसाथ कल्पना आहिरे यांनी दिली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊंची वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले.

राजमाता जिजाऊंनी केवळ एका राजाला जन्म दिला नाही, तर स्वराज्याचा विचार या मातीत रुजवला. अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द त्यांनी शिवरायांमध्ये निर्माण केली. त्या सामान्य जनतेच्या समस्या स्वतः न्यायनिवाडा करून सोडवत असत. त्या स्त्रीशक्तीचे प्रतीक व सक्षम मार्गदर्शक होत्या, असे मनोगत उपशिक्षिका स्मिता केदारे यांनी व्यक्त केले.

उपशिक्षक ज्ञानेश्वर पगार यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितले की, भारत सरकारने १९८४ पासून १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संस्कृती, अध्यात्म व राष्ट्रप्रेमाचा जगभर प्रसार करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंद होत. त्यांनी १८९७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली असून “शिवभावे जीवसेवा” हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. शिक्षण म्हणजे केवळ माहिती संकलन नसून माणूस घडविणे आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच “जेवढा मोठा संघर्ष, तेवढाच विजय भव्य” हा मोलाचा संदेश त्यांनी तरुणांना दिला.

उपशिक्षिका सुनिता जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, राजमाता जिजाऊंचे आयुष्य केवळ इतिहास नसून येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श आहे. ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम या सत्त्वगुणांचे संस्कार त्यांनी छत्रपती शिवरायांवर केले, असे त्यांनी नमूद केले.

पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार मांडताना “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका” तसेच “जीवनात जोखीम पत्करा; जिंकलात तर नेतृत्व करा, हारलात तर इतरांना मार्ग दाखवा” हे विचार विद्यार्थ्यांसमोर ठेवले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आहेर यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.